Saturday, 29 July 2017

वैद्यकिय गौप्यस्फोट १

मुखपृष्ठ »चतुरंगआरोग्यम् जनसंपदा

चार दशकांची ‘साखर’झोप..

आहाराबाबत फारसे संशोधन होताना दिसत नाही

मुक्ता गुंडी सागर अत्रे | Updated: July 29, 2017 5:23 AM

जागतिक राजकारणात अनेकदा शास्त्रीय सत्यांना आर्थिक गणितांपुढे माघार घ्यावी लागते. अमेरिकेतील ‘त्या’ घटनेमुळे हे पुन्हा एकदा समोर आले. चार दशकांची ही ‘साखर’झोप अमेरिकेला आणि पाश्चिमात्य देशांना महागात पडलीच, परंतु विकसित देशात ही उत्पादने कमी खपू लागल्यावर या कंपन्यांचे लक्ष गेले ते थेट भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेकडे. दुर्दैवाने, भारतात आजसुद्धा काही मोजक्या संस्था सोडल्यास आहाराबाबत फारसे संशोधन होताना दिसत नाही..

गेल्या अनेक दशकांपासून मानवी आरोग्याशी संबंधित विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे, परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मात्र त्याला अधिक गंभीर रूप मिळाले. आता माहितीचा प्रसार जसा वेगाने होऊ लागला आहे, तसाच या संशोधनाद्वारे पुढे येणाऱ्या माहितीचा प्रसारसुद्धा अधिक वेगाने होऊ लागला आहे. आपल्यापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपच्या, फेसबुकच्या माध्यमातून पोहोचणारी आरोग्याविषयीची माहिती आपण पडताळून घेतो का? आरोग्याविषयी सुरू असलेल्या संशोधनाबद्दल आपल्याला प्रश्न पडतात का? असे प्रश्न आपण स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे. कारण राजकारण आणि अर्थकारण यांनी आरोग्यक्षेत्रातील संशोधनाला आपल्या विळख्यात बांधून ठेवले तर ते किती धोकादायक असू शकते, हे गेल्या वर्षीच्या एका खुलाशाने सिद्ध झाले. हा खुलासा सामाजिक आरोग्यक्षेत्रातील तज्ञांना खडबडून जागे करणारा होता.

विसाव्या शतकात बहुतांश संसर्गजन्य रोगांची कारणे आणि निदान पुढे आल्यावर हृदयरोग, कर्करोग यांसारख्या काही जटिल आजारांवर संशोधन सुरू झाले. या तिन्ही रोगांची व्युत्पत्ती, कारणे आणि उपाय समजून घेण्याबाबत जागतिक पातळीवर ऊहापोह सुरू झाला. साहजिकच आहाराबाबतसुद्धा संशोधनात्मक पातळीवर नव्याने विचार सुरू झाला. १९५५मध्ये अ‍ॅन्सेल कीज या शास्त्रज्ञाने जागतिक आरोग्य संस्थेच्या एका परिषदेमध्ये ‘चरबीचे अन्नातील प्रमाण आणि हृदयरोग’ यांतील संबंधांवर भाष्य केले. कीज यांच्या या सिद्धांतामुळे ते एक महान शास्त्रज्ञ म्हणून गणले जाऊ लागले. ‘रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणि आरोग्य’ यांचा थेट संबंध असतो हे त्यांनी जगातील राज्यकर्त्यांच्या मनावर ठसवले आणि सात देशांतील आकडेवारीच्या आधारे त्यांनी हा संबंध जवळजवळ सिद्धच करून दाखविला. त्यानुसार अमेरिकेतील चरबीयुक्त पदार्थाशी संबंधित काही योजना बदलल्याही गेल्या.

हे सगळे जगासमोर घडत असताना काही शास्त्रज्ञांना मात्र आरोग्य आणि आहार यांच्यातील नाते इतके सरळ, बिनागुंतागुंतीचे असेल हे पटत नव्हते. त्यांच्यातील काही जणांचे लक्ष होते साखर, मैदा तसेच बाजारातील तंतुविरहित खाद्यउत्पादनांवर. या त्रयींमुळे अनेक रोगांची उत्पत्ती होते असे त्यांचे संशोधन सांगत होते. या संशोधनावर आधारित १९७२मध्ये जॉन युडकिन या शास्त्रज्ञाने ‘प्युअर, व्हाईट अँड डेडली’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात ‘मानवी आरोग्याचा प्रमुख शत्रू हा केवळ चरबी नसून साखर आणि अतिप्रक्रिया केलेली कबरेदके आहेत’, असे ठाम विधान करण्यात आले. कीज यांच्या चरबीविषयक फोफावणाऱ्या सिद्धान्ताच्या आणि मुख्य म्हणजे, खाद्य उत्पादकांच्या प्रचंड नफ्यावर पाय देणारे असे हे विधान होते. या सर्वानी युडकिनवर कठोर टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुठल्याही संशोधनाला मान्यताच मिळू दिली नाही!

युडकिन यांच्या दुर्दैवाने त्यांचा सिद्धान्त मांडण्यासाठी तो काळ काही राजकीय आणि आर्थिक कारणांमुळे अजिबातच पूरक नव्हता. त्याचे मुख्य कारण हे की अमेरिकेतील शेती विभागाकडे त्यावेळेस दोन परस्परविरोधी जबाबदाऱ्या होत्या. पहिली जबाबदारी म्हणजे ऊस, मका आणि इतर शेतकी उत्पादनांना सरकारी सवलतींची देखरेख करणे आणि दुसरी जबाबदारी म्हणजे अमेरिकेतील जनतेकरिता आहारविषयक मार्गदर्शक प्रणाली तयार करणे. या सवलतींवर मोठमोठय़ा कंपन्यांचे अर्थकारण विसंबून असल्यामुळे अर्थातच आहार निर्देशात साखर, मैदा आणि तंतुविरहित कबरेदके अशा पदार्थाबद्दल फारसे बोललेच जात नव्हते!

चरबीयुक्त पदार्थाची भीती जनमानसावर इतकी बसलेली होती की बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अनेक पदार्थामधून चरबी काढून टाकली जाऊ लागली. त्या चरबीविरहित बेचव पदार्थाना चव यावी याकरिता मुबलक प्रमाणात साखर आणि मीठ घालण्याशिवाय गत्यंतरच नव्हते आणि तसे करताना त्या पदार्थाची किंमत ही आटोक्यात ठेवायची होती. मक्यापासून निर्माण होणारे ‘हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप’ हा अतिस्वस्त गोड पदार्थ हा या सर्व निकषांवर उतरणारा होता. या ‘हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप’मुळे कंपन्यांचा नफा प्रचंड वाढला. या सिरपचा आरोग्यावर काय परिणाम होत असेल, याबाबत विचार करणे कंपन्यांनी मोठय़ा शिताफीने टाळले.

गेल्या १०-१५ वर्षांत मात्र आरोग्य-शास्त्रज्ञांना हे लक्षात येऊ लागले की आहारातील चरबीचे प्रमाण कमी करूनसुद्धा लठ्ठपणावर आणि हृदयरोगाच्या प्रमाणात झपाटय़ाने वाढच होत होते. त्यातून आता तर शाळकरी मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण वाढत होते! पुन्हा एकदा संशोधक साखर, मैदा, साखरयुक्त पेये इत्यादींचा बारकाईने अभ्यास करू लागले. त्यांच्या संशोधनाने आणि अथक प्रयत्नांनी सरकारचे लक्ष वेधण्यात त्यांना अखेरीस यश आले.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे अखेर मागील वर्षीच्या अमेरिकेच्या आहारनिर्देशात साखर आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत, तसेच भाज्या, फळे यांसारखे नैसर्गिक पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खावेत, असे स्पष्टपणे सांगितले गेले. थोडक्यात काय, तर साखर-मैदा आरोग्यासाठी घातक आहे हे सरकारला पटवण्यात अख्खी चार दशके गेली!

साखर-मैदा यांच्या मागचे चार दशकांचे हे राजकारणाचे-अर्थकारणाचे आख्यान खऱ्या अर्थाने आणि धक्कादायकरीत्या पुढे आले ते जून २०१६ मध्ये. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने जून २०१६मध्ये खुलासा केला की ‘अमेरिकेतील अनेक आहारतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ हे अजूनही बहुराष्ट्र कंपन्यांकडून पैसे घेऊन त्यांच्या निर्देशानुसार संशोधन करत असतात.’ या खुलाशाने काहीशी खळबळ झालीच, पण संशोधन जगताला पुरेसा धक्का मात्र बसला नाही (बहुधा हे वास्तव अनेकांना माहीत असावे!). खरा धक्का बसला तो सप्टेंबर २०१६ मध्ये.

सप्टेंबर २०१६ मध्ये असे उघड झाले की- १९६६ मध्ये, युडकीन यांचे ‘प्युअर, व्हाईट एंड डेडली’ हे पुस्तक यायच्या काहीसे आधी, कोकाकोला आणि तत्सम कंपन्यांना हे लक्षात आले की साखर आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थाबाबतचे शास्त्रीय पुरावे आपल्याला फार काळ लपवून ठेवणे शक्य होणार नाही. त्यावर त्यांनी एक नामी युक्ती काढली. त्यांनी जगद्विख्यात ‘हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’मधील तीन शास्त्रज्ञांना त्या काळात ६५०० डॉलरची घसघशीत रक्कम देऊन त्यांच्यासमोर द्विकलमी कार्यक्रम ठेवला- ‘चरबी आणि कोलेस्टेरॉललाच हृदयरोग आणि मधुमेहासाठी जबाबदार ठरवणे’ हा पहिला उद्देश आणि ‘साखर व मैद्याला अनारोग्यासाठी जबाबदार सिद्ध करणारे संशोधन अशास्त्रीय आहे हे सिद्ध करणारा शोधनिबंध लिहिणे’ हा दुसरा उद्देश; असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. १९६७ च्या ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या जगातील सगळ्यात नावाजलेल्या वैद्यकीय संशोधन मासिकात हा निबंध छापूनही आला. त्या निबंधाचे एक लेखक पुढे त्याच हार्वर्डमधील पब्लिक हेल्थ महाविद्यालयातील आहार आणि पोषण विभागाचे मुख्य झाले आणि दुसरे अमेरिकेच्या शेती विभागाचे प्रमुख झाले! ते दोघेही आज हयात नाहीत. गेली ४० वर्षे, अमेरिकेत आणि जगभरात चाललेला ‘फॅट फ्री’ अन्नाचा लढा हा अनेक बाबतीत कसा पोकळ आणि एकांगी होता, हे या खुलाशाने सिद्ध झाले आणि जगभरातील लोकांची होणारी ‘शास्त्रशुद्ध’ फसवणूकसुद्धा पुढे आली.

जागतिक राजकारणात अनेकदा शास्त्रीय सत्यांना आर्थिक गणितांपुढे माघार घ्यावी लागते, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सामोरे आले. त्यातून नुकसान होते ते अर्थातच- आरोग्याचे आणि अर्थव्यवस्थेचे! मॅकिन्सी या प्रतिष्ठित संशोधन संस्थेच्या अहवालानुसार ‘लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे जे आर्थिक नुकसान होते आणि जो खर्च होतो, तो वर्षांला २ ट्रिलीयन डॉलर इतका आहे.’ युद्ध, दहशतवाद आणि सशस्त्र लढाया यावर होणाऱ्या एकत्रित नुकसानापेक्षाही हा आकडा मोठा आहे; यावरून आपल्याला या नुकसानीचे गांभीर्य लक्षात येईल. भारताची अर्थव्यवस्थाच आज २.२९ ट्रिलीयन डॉलर इतकी आहे, असे मानले जाते. म्हणजेच भारताच्या जवळजवळ अख्ख्या अर्थव्यवस्थेइतके नुकसान आज हृदयरोग आणि मधुमेह या रोगांमुळे होते आहे.

चार दशकांची ही ‘साखर’झोप अमेरिकेला आणि पाश्चिमात्य देशांना महागात पडलीच, परंतु विकसित देशात ही उत्पादने कमी खपू लागल्यावर या कंपन्यांचे लक्ष गेले ते थेट भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेकडे. दुर्दैवाने, भारतात आजसुद्धा काही मोजक्या संस्था सोडल्यास आहाराबाबत फारसे संशोधन होताना दिसत नाही, किंवा होत असल्यास त्या संशोधनाचा प्रसार योग्य प्रमाणात होत नाही, असे दिसते. तसेच संशोधन पारदर्शक पद्धतीने आणि नैतिक मार्गाने होण्यासाठी गरजेचा असलेला समाजाचा रेटाही कमी पडतो आहे. जागतिक राजकारण, आणि कुटील अर्थकारण याचा विळखा आपल्या समाजाच्या आरोग्यावर होणे थांबवायचे असेल तर आपल्यापर्यंत पोहोचणारे आरोग्यविषयक संशोधन, माहिती ही चौकसपणे समजून घ्यायला हवी. आपण प्रत्येकाने स्वत:तली सजग संशोधक वृत्ती जागती ठेवायला हवी आणि प्रश्न विचारत राहायला हवेत!

मुक्ता गुंडी सागर अत्रे

Friday, 28 July 2017

प्राचीन भांडार १: ज्ञान नंतर पण तंत्राला दाद द्यावीच लागेल! खातरजमा करणे बाकी

Kedar Shukla:
आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! ‘हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून’ अश्या प्रश्नात आपण गुरफटले जातो. मग, ‘त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता कां नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..?’ हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात…!

याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे – ‘सिरी भूवलय’. किंवा श्री भूवलय. जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला. कर्नाटकात जेंव्हा राष्ट्रकुटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्ष होती आणि सम्राट अमोघवर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेंव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केंव्हा तरी लिहिला गेलेला..!

मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता. कुठे कुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे –

राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिध्द आयुर्वेद चिकित्सक धरणेन्द्र पंडितांच्या घरी पोहोचली. हे धरणेन्द्र पंडित, बंगळूर – तुमकुर रेल्वे मार्गावरील दोड्डबेले नावाच्या लहानश्या गावात रहायचे. या ग्रंथाबद्दल त्यांना फारशी माहिती नसली, तरी याचं महत्त्व ते जाणून होते. म्हणूनच आपले मित्र, चंदा पंडितांबरोबर ते ‘सिरी भूवलय’ या ग्रंथावर कन्नड भाषेत व्याख्यानं द्यायचे.

या व्याख्यानांमुळे, बंगळूर च्या ‘येल्लप्पा शास्त्री’ ह्या तरुण आयुर्वेदाचार्याला, हा ग्रंथ धरणेन्द्र शास्त्रींकडे आहे हे समजले. या ग्रंथासंबंधी येल्लप्पा शास्त्रींनी बरेच काही ऐकले होते. तेंव्हा हा ग्रंथ मिळवायचाच, हा निश्चय पक्का होता. मग काहीही करून ह्या ग्रंथाचे हस्तलिखित मिळविण्यासाठी येल्लप्पा शास्त्रींनी, दोड्डाबेला ला जाऊन धरणेन्द्र शास्त्रींच्या पुतणीशी विवाह केला.

पुढे १९१३ मधे धरणेन्द्र शास्त्रींचे निधन झाले. पूर्ण वेळ विद्याभ्यासात दिल्याने त्यांच्या घराची आर्थिक स्थिती फारच खराब झालेली होती. म्हणून त्यांच्या मुलाने, धरणेन्द्र शास्त्रींच्या काही वस्तू विकावयास काढल्या. त्यात ‘सिरी भूवलय’ हा ग्रंथ ही होता. अर्थातच आनंदाने येल्लप्पा शास्त्रींनी हा ग्रंथ विकत घेतला. त्या साठी त्यांना बायकोचे दागिने विकावे लागले. मात्र ग्रंथ हातात आल्यावरही शास्त्रींना त्याची उकल करता येत नव्हती. १२७० पानांच्या ह्या हस्तलिखितात सारेच अगम्य होते. पुढे १९२७ ला प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी करमंगलम श्रीकंठय्याजी बंगळुरात आले. त्यांच्या मदतीने ह्या ग्रंथाची किवाडं काहिशी किलकिली झाली.

या हस्तलिखितातील माहितीच्या आधारे प्रयत्न करत करत, त्यातील सांकेतिक माहितीची फोड करायला तब्बल ४० वर्षे जावी लागली. सन १९५३ मधे कन्नड साहित्य परिषदेनं ह्या ग्रंथाचं पहिल्यांदा प्रकाशन केलं. ग्रंथाचे संपादक होते – येल्लप्पा शास्त्री, करमंगलम श्रीकंठय्या आणि अनंत सुब्बाराव. यातील अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते. त्यांनीच पहिला कन्नड टाईपरायटर तयार केला होता.

असं काय महत्वाचं होतं ह्या ग्रंथात, ज्या साठी लोकं आपलं आख्खं आयुष्य वेचायला तयार होती..?

हा ग्रंथ, इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिलेला नाही. तर हा अंकांमधे लिहिलेला आहे. हे अंक ही १ ते ६४ मधील आहेत. हे अंक किंवा आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की एखाद्या विशिष्ट भाषेत, विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथ कर्त्याच्या, अर्थात मुनि कुमुदेन्दुंच्या मते हा ग्रंथ १८ लिप्या आणि ७१८ भाषांमध्ये वाचता येतो.

हा ग्रंथ म्हणजे अक्षरशः विश्वकोश आहे. ह्या एका ग्रंथात अनेक ग्रंथ दडलेले आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, अनेक जैन ग्रंथ या एका ग्रंथात सामावलेले आहेत. गणित, खगोलशास्त्र, रसायन शास्त्र, इतिहास, वैद्याक, तत्वज्ञान सारख्या अनेक विषयांवरील ग्रंथ ही या एकाच ग्रंथात वाचता येतात.

या ग्रंथाची १६,००० पाने होती असा ग्रंथातच कुठे उल्लेख आहे. त्यातील फक्त १२७० पानेच सध्या उपलब्ध आहेत. एकूण ५६ अध्याय असलेल्या ह्या ग्रंथाच्या फक्त तीन अध्यायांचीच उकल करणे सध्या शक्य झाले आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांपैकी सध्या कन्नड, तामिळ, तेलुगु, संस्कृत, मराठी, प्राकृत इत्यादी भाषांमधुनच हा ग्रंथ वाचता येतो. एखाद्या संगणकीय विश्वकोशा सारखे या ग्रंथाचे स्वरूप आहे. ह्या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेंव्हा उलगडली जाईल, तेंव्हा त्याची प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट होऊ शकतील.

हा ग्रंथ लिपीत नसून आकड्यात आहे, हे आपण बघितलंच. त्यातही फक्त १ ते ६४ अंकांचाच वापर केलेला आहे. आता कुमुदेंदू मुनिंनी फक्त ६४ पर्यंतच आकडे कां घेतले..? तर ६४ हे ध्वनींचे संकेत आहेत, ज्यात ऱ्हस्व, दीर्घ आणि लुप्त मिळून २५ स्वर, क, च, न, प सारखे २५ वर्गीय वर्ण, य, र, ल, व सारखे अवर्गीय व

्यंजन इत्यादी मिळून ६४ ही संख्या होते.

या संख्यांना २७ X २७ च्या चौकोनांमध्ये मांडल्या जाते. आता हे जे ७२९ अंक चौकोनांमध्ये येतात, त्यांना ग्रंथात दिलेल्या निर्देशांनुसार खालून-वर, वरून-खाली, उभे-आडवे वगैरे करून लिहिले आणि त्यांना त्या भाषेच्या वर्ण क्रमानुसार मांडले (उदा – ४ हा अंक असेल तर मराठी तील वर्ण ‘घ’ येईल. क, ख, ग, घ.. प्रमाणे), तर छंदोबध्द काव्य अथवा धर्म, दर्शन, कला.. वगैरे प्रकारचा ग्रंथ तयार होतो..!

काय अफाट आहे हे…!

आणि किती अद्भुत..! आपण आपल्या ‘सुडोकू’ चा लहानसा चौकोन तयार करायला संगणकाची मदत घेतो. अन इथे हजार / बाराशे वर्षांपूर्वी एक जैन मुनि आपल्या कुशाग्र आणि अद्भुत बुध्दीचा परिचय देऊन फक्त अंकांमधून विश्वकोश तयार करतात..!

सारंच अतर्क्य..!!

या ग्रंथाचं प्रत्येक पान म्हणजे २७ X २७ असा ७२९ अंकांचा भला मोठा चौकोन आहे. या चौकोनाला चक्र म्हणतात. अशी १२७० चक्र सध्या उपलब्ध आहेत. या चक्रांमध्ये ५६ अध्याय आहेत आणि एकूण श्लोकांची संख्या सहा लाखांच्या वर आहे. या ग्रंथाचे एकूण ९ खंड आहेत. उपलब्ध असलेले १२७० चक्र हे पहिल्या खंडातीलच आहेत, ज्याचं नाव आहे – ‘मंगला प्रभृता’. एक प्रकारे हा खंड म्हणजे इतर ८ खंडांची फक्त ओळख आहे. अंकांच्या स्वरूपात यात १४ लाख अक्षरं आहेत. यातून ६ लाख श्लोक तयार होतात.

या प्रत्येक चक्रात काही ‘बंध’ आहेत. बंध म्हणजे अंकांना वाचण्याची पध्दत किंवा एका चक्राच्या आत अंक मांडण्याची पध्दत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ‘बंध’ म्हणजे तो श्लोक, किंवा तो ग्रंथ वाचण्याची किल्ली (किंवा पासवर्ड) आहे. या बंधामुळे आपल्याला त्या चक्रातील ७२९ अंकांमधला पेटर्न कळतो आणि मग त्या त्या भाषेप्रमाणे तो ग्रंथ उलगडू लागतो. या बंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे – चक्र-बंध, नवमांक-बंध, विमलांक-बंध, हंस-बंध, सारस-बंध, श्रेणी-बंध, मयूर-बंध, चित्र-बंध इत्यादी.

गेल्या अनेक वर्षांपासून ह्या भूवलय ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचे काम चालू आहे. अनेक जैन संस्थांनी हां ग्रंथ, प्रकल्प म्हणून स्वीकारला आहे. इंदूर ला जैन साहित्याच्या संशोधनाचं ‘कुन्द्कुंद ज्ञानपीठ’ उभं राहिलंय, जिथे डॉ. महेंद्र कुमार जैन यांनी या विषयावर बरेच काम केले आहे. आय. टी. क्षेत्रातल्या काही जैन तरुणांनी या विषयावरील वेबसाईट तर चालू केलीच आहे, पण संगणकाची मदत घेऊन या ग्रंथाला ‘डी-कोड’ करण्याचं काम केलं जातंय. अगदी लहान प्रमाणात त्याला यश ही आलंय.

मात्र तरीही. . . .

आज एकविसाव्या शतकाचं सोळावं वर्ष संपत असतानाही, जगभरातले अनेक जैन विद्वान या ग्रंथावर काम करत असतानाही, प्रगत संगणक प्रणालीचे अल्गोरिदम वापरूनही……

ह्या ग्रंथाची उकल झालेली नाही..! ५६ पैकी फक्त तीनच अध्याय ‘डी-कोड’ होऊ शकले आहेत…

मग हजार – बाराशे वर्षांपूर्वी, आजच्या सारखी कसलीही साधनं हाताशी नसताना, मुनि कुमुदेन्दुंनी इतका क्लिष्ट ग्रंथ कसा रचला असेल..? बरं, मुनिवर्य कन्नड भाषिक होते. मग त्यांना इतर भाषांचे असे अवजड अल्गोरिदम्स तयार करणं कसं जमलं असेल..?

आणि मुळात इतकी कुशाग्र आणि अफाट बुध्दिमत्ता त्यांच्याजवळ कुठून आली असेल..?

‘इंडोलॉजी’ च्या क्षेत्रातलं, भारतातलं आदरानं घेतलं जाणारं नाव आहे, श्री एस. श्रीकांत शास्त्रींचं (१९०४ – १९७४). त्यांनी ‘भूवलय’ ह्या ग्रंथाबद्दल लिहून ठेवलंय – “हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य, तसेच संस्कृत, प्राकृत, तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटक च्या इतिहासावर प्रकाश टाकतो. भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि जीवन विज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा, प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखिल उपयुक्त आहे. यातील रामायण, महाभारत, भागवत गीता, ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरी भूवलय मध्ये सापडू शकतात”.

ह्या ग्रंथाची माहिती जेंव्हा आपले पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना मिळाली, तेंव्हा त्यांचे उस्फूर्त उद्गार होते – ‘हा श्री भूवलय ग्रंथ म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे..!’

एका अर्थानं हे खरंय. कारण जगाच्या पाठीवर कुठेही असा ‘एकात अनेक ग्रंथ’ असलेला, कूट पद्धतीनं लिहिलेला विश्वकोश आढळत नाही.

आपलं दुर्दैव इतकंच की भारतीय ज्ञानाचा हा अमोल खजिना आपल्याला तरी कुठे माहीत होता..?
– प्रशांत पोळ

Wednesday, 26 July 2017

कालगती

वो कुँए का मैला कुचला पानी
पिके भी 100 वर्ष जी लेते थे

हम RO का शुद्ध पानी पीकर
40 वर्ष में बुढे हो रहे है।

वो घाणी का मैला सा तैल खाके बुढ़ापे में भी दौड़~मेहनत कर लेते थे।

हम डबल~ट्रिपल फ़िल्टर तैल
खाकर जवानी में भी हाँफ जाते है।*

वो डळे वाला लूण खाके
बीमार ना पड़ते थे।

हम आयोडीन युक्त खाके
हाई~लो बीपी लिये पड़े है।

वो निम~बबूल कोयला नमक
से दाँत चमकाते थे और 80 वर्ष
तक भी चब्बा~चब्बा कर खाते थे।*

और हम कॉलगेट सुरक्षा वाले रोज डेंटिस्ट के चक्कर लगाते है ।।

वो नाड़ी पकड़ कर
रोग बता देते थे और

आज जाँचे कराने पर भी
रोग नहीं जान पाते है।

वो 7~8 बच्चे जन्मने वाली माँ 80 वर्ष की अवस्था में भी घर~खेत का काम करती थी।

आज 1महीने से डॉक्टर की देख~रेख में रहते है फिर भी बच्चे पेट फाड़ कर जन्मते है।।

पहले काळे गुड़ की मिठाइयां
ठोक ठोक के खा जाते थे।

आजकल तो खाने से पहले ही
सुगर की बीमारी हो जाती है।

पहले बुजर्गो के भी
गोडे मोढे नहीं दुखते थे।

*जवान भी घुटनो और कन्धों*
     *के दर्द से कहराता है*

और भी बहुत सी समस्याये है फिर भी लोग इसे विज्ञान का युग कहते है,
*समझ नहीं आता ये विज्ञान का युग है या अज्ञान का ?????*