Monday, 24 July 2017

पसायदान

💚💛💜💚💛💜💚💛💜
*🍯 पसायदान  भावार्थ 🍯*
🐚🔔🐚🔔🐚🔔🐚🔔🐚
महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. त्यात संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सावतामाळी अश्या अनेक संतांचा समावेश आहे. *आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये , विचार, आचार , चांगुलपणा , सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठी मातीत आले ते या संतांच्या शिकवणी मुळेच* .
संत ज्ञानेश्वर म्हणजेच 'माउली' यांनी "ज्ञानेश्वरी  " उर्फ " भावार्थ दीपिका "या ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या  शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे  *पसायदान* " मागितले .
ते पसायदान आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा *अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व आधुनिक पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न*.
🐚⛳🐚⛳🐚⛳🐚⛳🐚

*🌷आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।*
श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देवाला अर्पण करून त्या वांग्मयाचे फळ म्हणून देवाकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादरुपी पसायदान  मागितले  .

*🌷जे खळांची व्यंकटी सांडो ।तया  सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें ।।*
या पसायदानात ते मागतात कि जे  वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जाऊन त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे. आणि सर्व माणसे चांगल्या मार्गाला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचे भावबंध निर्माण व्हावे . 

*🌷दुरिताचें तिमिर जावो । विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात।।*
वाईट लोकांच्या जीवनातला अंधार दूर होऊन सर्व विश्वात स्वधर्म रुपी सूर्याचा उदय होवो. आणि सर्व प्राणिमात्रांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत . ते जे मागतील ते सर्व त्यांना मिळो.

*🌷वर्षत सकळ मंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ।।*
सर्व ईश्वरनिष्ठ संतांनी इथल्या भूमीवर मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी  यावे व सर्व प्राणीमात्रांना भेटावे . 

*🌷चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।*
त्या संतांच वर्णन ज्ञानेश्वर अस करतात कि ते संत म्हणजे कल्पतारुंचे उद्याने , चेत्नारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न , आणि ज्यांचे  बोल हे अमृताप्रमाणे आहेत असेच आहेत .


*🌷चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन। ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु।*

ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत , ताप नसलेले सुर्य आहेत व  ते सर्व सज्जनांचे मित्र आहेत .

*🌷किंबहुना सर्व सुखीं । पूर्ण होउनि तिहीं लोकीं । भजिजो आदीपुरुखी । अखंडित ।।*
या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेवराची अखंडित सेवा करत राहावी .

*🌷आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं ईयें । दृष्टा दृष्ट विजयें । होआवें जी।*
आणि या ग्रंथाला जीवन मानून सर्व दुष्ट प्रवृतींवर विजय मिळवून सुखी व्हावे .

*🌷तेथ म्हणे श्रीविश्र्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणेंवरें ज्ञांनदेवो । सुखिया जाला ।।*
त्यावर विश्वेश्वारांनी प्रसन्न होऊन हा वर ज्ञानेश्वरांना दिला , व ज्ञानेश्वर आनंदी झाले .
🔘⚪🔘⚪🔘⚪🔘⚪🔘
तर मित्रांनो हा मूळ पसायदानाचा शब्दशः अर्थ नसून सोप्या भाषेतला अर्थ आहे . ज्ञानेश्वरांनी आपल्या कल्याणासाठी मागितलेली हि प्रार्थना खरोखरच खूप सुंदर आहे .
हा अर्थ तुम्हाला आवडला असल्यास त्याचे सर्व श्रेय ज्ञानेश्वर चरणी अर्पण , व यात काही चुका असल्यास त्या मात्र निसंशय माझ्या !
🐚⛳🐚⛳🐚⛳🐚⛳🐚

No comments:

Post a Comment